Connect with us

गोवा खबर

वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी FCI चा पुढाकार; ५० हजार मेट्रिक टन तांदळाचा ई-लिलाव

Published

on

Spread the love

गोवा खबर : देशांतर्गत बाजारपेठेत अन्नधान्याचा पुरवठा वाढवून तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाने (FCI) कंबर कसली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने ‘खुल्या बाजार विक्री योजने’अंतर्गत (OMSS-D) ई-लिलावाद्वारे तांदूळ विक्रीसाठी निविदा मागवल्या आहेत. या प्रक्रियेमुळे घाऊक व्यापारी आणि ग्राहकांना मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

लिलावाचा तपशील आणि उपलब्ध साठा:

येत्या २५ आणि २६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या ई-लिलावासाठी खालीलप्रमाणे साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे:

  • महाराष्ट्र विभाग: एकूण ५०,००० मेट्रिक टन तांदूळ.
  • नॉन-एफआरके कस्टम मिल्ड राईस (CMR): ४०,००० मेट्रिक टन (ज्यात १०% तुकडा तांदळाचा समावेश आहे). यामध्ये पंजाबमधील १०,००० मेट्रिक टन आणि आंध्र प्रदेशमधील ३०,००० मेट्रिक टन साठ्याचा समावेश आहे.

सहभागासाठी अटी आणि नियम:

  • नावनोंदणी: इच्छुक व्यापारी आणि ग्राहकांना एफसीआयचे अधिकृत सेवा पुरवठादार ‘एमजंक्शन सर्व्हिसेस लिमिटेड’च्या https://www.valuejunction.in/fci/ या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • किमान मर्यादा: नोंदणीकृत बोलीदारांना किमान २,६५० मेट्रिक टन तांदळासाठी बोली लावता येईल.
  • वितरण व्यवस्था: निवड झालेल्या बोलीदारांना मालाची वाहतूक आणि वितरणासाठी तो माल नेमका कुठे पाठवला जाणार आहे, याची माहिती संबंधित महाव्यवस्थापकांना (प्रादेशिक) द्यावी लागेल.

“बाजारपेठेत तांदळाची उपलब्धता वाढवून सामान्य जनतेला वाढत्या महागाईतून दिलासा देणे, हा या खुल्या बाजार विक्री योजनेचा मुख्य उद्देश आहे.”

भारतीय अन्न महामंडळ (महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय)

Continue Reading