Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून जनतेला घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना गोवा घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, गोवा घटक राज्य दिन हा राज्याच्या गौरवशाली इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. १९८७ मध्ये याच दिवशी गोवा भारतीय संघराज्याचे २५ वे राज्य बनले. घटक राज्याचा प्रवास दीर्घ आणि आव्हानात्मक होता. डिसेंबर १९६१ मध्ये गोवा वसाहतवादी राजवटीतून मुक्त झाला असला तरी गोवा स्वतंत्र अस्तित्वात राहावा की शेजारील राज्यांमध्ये विलीन व्हावा हा एक प्रमुख प्रश्न होता. १९६७ मध्ये झालेल्या जनमत कौलाने गोवा एक वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व टिकविण्याची लोकांची इच्छा पूर्ण झाली. ३० मे १९८७ हा दिवस गोव्याचे वेगळी ओळख जपण्यासाठी गोमंतकीयांनी केलेल्या चळवळीचा सन्मान आहे. घटक राज्याचा दर्जा मिळाल्याने दीर्घकाळापासूनचे स्वप्न खऱ्या लोकशाही भावनेने पूर्ण झाले. राज्य घटनेने गोव्यातील लोकांना त्यांचे योग्य व्यक्तिमत्व मिळाले आणि त्यांचे स्वतःचे भविष्य घडविण्याची संधी मिळाली.

या ऐतिहासिक कामगिरीत योगदान देणाऱ्या नेत्यांचे, तज्ञ आणि नागरिकांचे कृतज्ञतेने आपण स्मरण करूया. “त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्याचा दर्जा सत्यात आले आणि आपल्या राजकीय इतिहासात एक निर्णायक अध्याय घडला.

राज्यपाल पुढे म्हणतात, “आज गोवा हे एक आधुनिक, भविष्यवादी राज्य आहे. गोव्यातील लोक त्यांच्या प्रगतीशील मूल्यांसाठी आणि आदरातिथ्यासाठी ओळखले जातात. राज्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह गोवा एक अव्वल पर्यटन स्थळ बनले आहे. समुद्रकिनारे, प्रार्थनास्थळे आणि स्थापत्य वारशासाठी प्रसिद्ध आहे, समृद्ध जैवविविधतेने गोवा समृद्ध आहे आणि  या जैवविविधता जागतिक ओळख लाभली आहे.

 गेल्या दशकांमध्ये गोवा राज्याने शिक्षण, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. गोवा आज लोकशाही तत्वांचे पालन करून “कर्तव्य काल” च्या भावनेतून कार्य करते. विकसीत, समृध्द आणि राष्ट्र- विकसित भारत निर्माण करण्यासाठी योगदान देते.

भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक असले तरी गोवा दरडोई उत्पन्नात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच रस्ते, रेल्वे, हवाई आणि समुद्राद्वारे प्रमुख महानगर केंद्रांशी जोडलेले आहे. २०२० पासून १९ एनएएटी मशीनचा वापर करून राज्यात लवकर क्षयरोग तपासण्यासाठी सुविधा सुरू करणारे गोवा हे भारतातील पहिले राज्य आहे. आरोग्य आणि कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी ७ व्या जेआरडी टाटा मेमोरियल परिषदेत गोव्याला उत्कृष्ट प्रगती करणाऱ्या राज्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आयुषमान भारत डिजिटल मिशनखाली राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेच्या १०० मायक्रोसाइट्स प्रोजेक्ट या प्रकल्पाची अंमलबजावणी  करणाऱ्या पहिल्या तीन राज्यांमध्ये गोव्याचा समावेश आहे. सलग पाचव्या वर्षी गोव्याने अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकात लहान राज्यांमध्ये प्रथम स्थान मिळविले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीची खात्री करण्यासाठी गोवा राज्य शाळा मानक मूल्यांकन आणि मान्यता प्राधिकरणाची स्थापन करणारे पहिले राज्य आहे. “नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कनुसार, गोवा फार्मसी महाविध्यालयास भारतातील टॉप १०० फार्मसी संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे.

राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीद्दल आनंद व्यक्त करीत राज्यपाल म्हणतात की गोवा नजीकच्या भविष्यात एक गतिमान क्रीडा केंद्र म्हणून उदयास येण्यास सज्ज झाले आहे. “पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात  गोव्याने सडा ते वरुणापुरीला जोडणारा भारतातील पहिला वक्र केबल-स्टेड पूल, गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे महत्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी स्वतंत्र विभाग सुरू करून दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणाची खात्री देणारे गोवा हे पहिले राज्य आहे. मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य आहे. नीती आयोगाने जारी केलेल्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांक २०२४ नुसार, गोवा चौथ्या क्रमांकावर असून “फ्रंट रनर” श्रेणीत स्थान मिळविले आहे.

निती आयोगाने प्रकाशित केलेल्या शाश्वत विकास उद्दीष्ट दर्शक २०२४ प्रमाणे गोव्याने आपला ४ था क्रमांक टिकवून ठेवला आणि पहिल्या वर्गात स्थान प्राप्त केले आहे.

२०२१ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यापासून, त्यांनी लोकांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी राज्यभर अनेक यात्रा केल्या आहेत त्यात गोवा ग्राम संपूर्ण यात्रा, सैमिक दायज यात्रा, द्वीप परिचय यात्रा आणि गोवा गिर्यारोहण यात्रा यांचा समावेश आहे. “गोव्यात अलिकडेच घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या आणि देशासमोरील व्यापक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर,राज्यपालांनी  एक नवीन उपक्रम – “खुशाल कल्याण यात्रा” जाहीर केला. या यात्रेचा एक भाग म्हणून श्री अनंत पद्मनाभ मंदिर (सावई वेरे), श्री महालसा नारायणी मंदिर (म्हार्दोळ) आणि राशोल सेमिनरी यासारख्या विविध प्रार्थनास्थळांना भेट दिली आणि सर्वांसाठी शांतता, आनंद आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.”

गोव्यातील राजभवन येथे प्राचीन भारतीय वैद्यकीय दिग्गज आचार्य चरक आणि ऋषी सुश्रुत यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. “राजभवन परिसरात असलेल्या वामन वृक्ष कला उद्यानात (बोन्साई बाग) कांस्य पुतळे स्थापित करण्यात आले, ज्यामध्ये १,००८ हून अधिक कुंड्यांमध्ये लावलेली बोन्साई झाडे आहेत, ज्यामुळे ते भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठे संग्रह बनले आहे . उद्घाटन समारंभाचे नेतृत्व भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. वैद्यकीय शास्त्रात चरक आणि सुश्रुत यांच्या सखोल योगदानाचा सन्मान करणे आणि भारताचा समृद्ध वैद्यकीय वारसा जपणे हे या स्थापनेचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, या बागेत १,००० हून अधिक प्राचीन आयुर्वेदिक प्रक्रिया आणि उपकरणांचे संकल्पनात्मक रेखाचित्रे आहेत, जे पारंपारिक उपचार पद्धतींना पुनरुज्जीवित करण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेवर अधिक भर देतात.

गोवा घटक राज्य दिनाच्या संस्मरणीय प्रसंगी, राज्यपालांनी लोकांना विकसित गोवा आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनासाठी आणि एकता, वचनबद्धता आणि अभिमानाने एकत्र काम करण्यास समर्पित होऊया असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.