गोवा खबर : ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या उपक्रमाने लाखो लोकांना प्रेरित केले असून भारताच्या प्रगतीमध्ये महिलांना अग्रस्थान मिळवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिहिलेला लेख दर्शवतो की भारताच्या मुली परिवर्तनकर्त्या, उद्योजिका आणि नेत्या म्हणून पुढे येत आहेत, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर सामायिक केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी जी यांनी दाखवून दिले आहे की,भारताच्या मुली परिवर्तनकर्त्या, उद्योजिका आणि नेत्या म्हणून उदयास येत आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमाने लाखो लोकांना प्रेरित केले आहे आणि भारताच्या प्रगतीत महिलांना अग्रस्थान दिले आहे.