Connect with us

गोवा खबर

पेडणे अपघातप्रकरणी कंत्राटदार, सरकारी विभागाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची काँग्रेसची मागणी

Published

on

Spread the love
गोवा खबर : पेडणे येथील सुकेकुळण येथे अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्या प्रकरणी वाहतूक पोलीस, पीडब्ल्यूडी, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रस्ते कंत्राटदार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी काँग्रेसने मंगळवारी केली.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पेडणे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना घेराव घालून दुचाकीस्वाराच्या हत्येला कारणीभूत असलेल्या ट्रकचालकाला का पकडले नाही, असा सवाल केला.
याबाबत काँग्रेसने पोलिसांना निवेदनही दिले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके, जितेंद्र गावकर, जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, नारायण रेडकर, प्रदिप हरमलकर, प्रमेश मयेकर, प्रणव परब, संजय बर्डे, मिंगेल फर्नांडिस, बाबुसो तळकर, रामचंद्र पालयेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, कृष्णा नाईक, राजेंद्र रेडकर, प्रदीप हरमलकर, कृष्णा नाईक, राजेंद्र रेडकर, प्रणव परब, प्रकाश पिरणकर, ग्लोरिया लोबो आदी उपस्थित होते.
पाटकर म्हणाले की, रस्ता बांधकाम करत असताना अशोका बिल्डकॉनच्या हेवी कमर्शिअल ट्रकला झालेल्या भीषण अपघातात नामदेव कांबळी याचा मृत्यू झाला.
“पोलिसांनी सांगितले आहे की या ड्रायव्हरची कोणतीही पोलिस पडताळणी नाही, तो घटनास्थळावरून पळून गेला आणि पोलिस त्याला पकडण्यास अपयशी ठरले आहेत,” असे पाटकर म्हणाले.
‘‘सार्वजनिक बांधकाम खाते, कंत्राटदार, वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा,” अशी मागणी पाटकर यांनी केली.
“मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की कंत्राटदार आणि सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा का नोंदवला जात नाही,” असे ते म्हणाले.
विजय भिके म्हणाले की, अपघातस्थळी आंदोलन करणाऱ्या स्थानिकांवरील एफआयआर मागे घेण्यात यावा. “अनेक अपघात होत आहेत. रस्ता तयार करताना तिथे उपाययोजना न करणाऱ्या कंत्राटदारावर वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत,” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, जे घटनास्थळी उपस्थित नव्हते आणि राज्याच्या बाहेर होते अशा व्यक्तीं विरुद्धही एफआयआर दाखल केला गेला आहे.
 “आमदार जनतेचा सूड घेत आहेत असे दिसते.’’ असे ते म्हणाले.
वीरेंद्र शिरोडकर म्हणाले की, वाहनांची सुरळीत आणि सुरक्षित हालचाल सुलभ करण्यासाठी वाहतूक विभाग रस्त्यांवर योग्य पायाभूत सुविधा जसे की सिग्नल, ट्रॅफिक सिग्नल आणि इतर गॅझेट प्रदान करण्यात अपयशी ठरला आहे.