Connect with us

गोवा खबर

पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने लाभार्थी सहभागी

Published

on

Spread the love

गोवा खबर:रवींद्र भवन, मडगाव येथे दक्षिण जिल्हा पातळीवर आयोजित थेट स्क्रीनिंग कार्यक्रमात सुमारे १६ योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान थेट संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने लाभार्थी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम, भारत सरकारच्या 9 मंत्रालयांनी व्यापलेला हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांच्यानिमित्ताने देशभरात साजरा केला जातो. आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम ‘गरीब कल्याण संमेलन’ अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण आणि शहरी) जल जीवन मिशन आणि अमृत, प्रधानमंत्री स्वानिधी योजना, एक राष्ट्र-एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रे आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना यांसारख्या विस्तृत योजना व कार्यक्रमांच्या प्रभावाविषयी पंतप्रधानांनी देशातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

परिवहन, उद्योग, पंचायत राज आणि शिष्टाचार मंत्री, श्री माविन गुदिन्हो, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि ग्रामीण विकास मंत्री श्री गोविंद गावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई, एनआरआय आयुक्त श्री नरेंद्र सावईकर यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या संवादापूर्वी मंत्री श्री माविन गुदिन्हो यांनी आपल्या भाषणात योजनांचा लाभ गरजूंना होतो की नाही हे पंतप्रधान वैयक्तिकरित्या देखरेख करतात असे सांगितले. योजना गरजू व्यक्ती आणि देशाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी पंतप्रधान आपले मंत्री, आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून आहेत. गोव्याचा वेगाने विकास होत आहे आणि पायाभूत सुविधा ज्या प्रकारे आकार घेत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. कौशल्य विकासावरही भर दिला जातो. भारताकडे ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था गाठण्याची क्षमता आहे जी जगाशी स्पर्धा करील असे ते म्हणाले.

मंत्री श्री. गोविंद गावडे यांनी सरकारी योजना माणसाला स्वाभिमानाने आणि अभिमानाने जीवन जगण्यास मदत करतात असे सांगितले. कोणीही आपले डोके झुकवू नये असे सरकारचे मत आहे आणि त्यामुळेच सरकार विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मदत करते असे ते म्हणाले. विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी खूप प्रगती केली आहे. महामारीच्या कठीण काळात सरकारने आपल्या लोकांना मोफत रेशन दिले ज्याचे संपूर्ण देशाने कौतुक केले. एक देश एक रेशन ही चांगली संकल्पना आहे असेही ते म्हणाले.

विविध योजनांच्या लाभार्थ्यांनीही त्यांना योजनांचा कसा फायदा झाला याबाबत त्यांचे विचार मांडले.

जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कुमारी, आय.ए.एस. यांनी स्वागत केले. यावेळी अतिरीक्त  जिल्हाधिकारी श्री परेश फळदेसाई यावेळी उपस्थित होते. श्री अनिल पै यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात जिल्हा पंचायत सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच यांनीही सहभाग घेतला.