गोवा खबर : रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पासाठी कोळसा हाताळणीसाठी जमीन संपादन सुरू असल्याच्या अफवा खोट्या असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
रेल विकास निगम लिमिटेडच्या माहितीनुसार, कासावली, सांकवाळ आणि इसोशीम परिसरातून जाणाऱ्या या प्रकल्पासाठी केवळ ०.६ हेक्टर जमीनच वापरली जाणार आहे. सरकारने सांगितले की, या प्रकल्पामुळे कोळसा वाहतुकीची क्षमता वाढणार नाही, उलट प्रदूषण कमी होऊन पर्यटनाला चालना मिळेल.