गोवा खबर : फक्त गुण मिळवण्याची धडपड करू नका, चौकस बना व ध्येय निश्चित करा, असे मार्गदर्शन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विद्यार्थ्यांना केले.
व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे, न्यायमूर्ती महेश सोनक, न्यायमूर्ती भारती डांगरे व दत्तराज साळगावकर उपस्थित होते.
गवई यांनी तरुण वकिलांचे कौतुक करताना स्वतःच्या शैक्षणिक आयुष्यातील गंमतीशीर आठवणीही सांगितल्या.