गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कीव येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली.
सुसंवादी समाज निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या शांततेच्या संदेशाची कालातीत प्रासंगिकता पंतप्रधानांनी अधोरेखित केली. महात्मा गांधी यांनी दाखवलेला मार्ग आजच्या अनेक जागतिक आव्हानांवर उपाय देऊ करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
कीवमधील ‘ओएसिस ऑफ पीस’ पार्कमध्ये असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा मानवतेसाठी आशा आणि शांततेचा किरण आहे.