Connect with us

गोवा खबर

आलेमाव यांनी शून्य तासात उठवला कृषी विद्यार्थ्यांचा मुद्दा

Published

on

Spread the love

गोवा खबर : विरोधी पक्षाचे नेते युरी आलेमाव यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरच्या सुमारे 200 माजी विद्यार्थ्यांचा मुद्दा उठवला, जे कृषी अभ्यासक्रम पूर्ण करूनही कृषी विभागाच्या जाहिरात केलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकत नाही. 

या महाविद्यालयाला मान्यताप्राप्त संस्था म्हणून मानले जात नसल्याने, माजी विद्यार्थ्यां समोर हा प्रश्न उपस्थित झाला आहे असे ते म्हणाले.

जेव्हा मान्यता प्रक्रिया सुरू होती तेव्हा, कृषी महाविद्यालयावर गोवा सरकारने ताबा घेतला. सरकारने शिक्षक आणि अनुदेशिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण केले, परंतु विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या शैक्षणिक कार्यक्रमाला मान्यता मिळविण्यासाठी कोणतीही उपाययोजना घेतली नाही, असे आलेमाव यांनी सांगितले.

युरी आलेमाव यांनी सरकाराला या बाबीची तपासणी करण्याचे आणि गोवा सरकारने जाहिरात केलेल्या पदांसाठी आवश्यक शिथिलता प्रदान करून कृषी महाविद्यालयाच्या 200 माजी विद्यार्थ्यांना आवश्यक मदत करण्याचे आवाहन केले आहे.