गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जालियनवाला बागेतील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. भावी पिढ्या या शहीदांच्या अदम्य देशप्रेमाचे नेहमीच स्मरण करतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात लिहिले आहे, आम्ही जालियनवाला बागेतील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो. भावी पिढ्या त्यांच्या अदम्य देशप्रेमाचे नेहमीच स्मरण करतील. हा खरोखरच आपल्या देशाच्या इतिहासातील एक काळा अध्याय होता. त्यांचे बलिदान भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणारे एक प्रमुख वळण ठरले.