गोवा खबर : शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी केंद्र सरकार बियाण्यापासून ते बाजारपेठांपर्यंत शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लिहिलेल्या एका लेखावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे, देशभरातील शेतकरी बंधु भगिनींच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. आम्ही बियाण्यापासून ते बाजारपेठांपर्यंत कशाप्रकारे सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, ते कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या या लेखातून दिसून येते आहे.