Connect with us

गोवा खबर

कायदा करण्यासह ‘लव्ह जिहाद’ची चर्चा घरोघरी व्हायला हवी !:अधिवक्त्या मणि मित्तल

Published

on

Spread the love
‘साक्षी, श्रद्धा…कधीपर्यंत ‘लव्ह जिहाद’मध्ये हत्या होत राहणार ?’ या विषयावर विशेष संवाद

 

गोवा खबर:लव्ह जिहाद’ हे नियोजनबद्ध षड्यंत्र आहेयासाठी मोठ्या प्रमाणात धर्मांधांना पैसा पुरवला जात आहेलव्ह जिहादींना वाचविण्यासाठी त्यांना कायदेशीर साहाय्य केले जात आहेधर्मांतरासाठी हिंदू युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळयात फसवून त्यांच्या हत्या होत आहेतकायद्याच्या स्वतःच्या मर्यादा असल्याने ते लोकांना संरक्षण देण्यात अपयशी ठरले आहेआज हिंदू पालक आणि युवतींमध्ये जागृती न झाल्याने अनेक हिंदू युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेतत्यांना सहजपणे लक्ष्य केले जात आहेम्हणूनच ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदा करावाअशी मागणी करत ‘लव्ह जिहाद’ या विषयावर घरोघरी चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मणी मित्तल यांनी व्यक्त केले. त्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘साक्षीश्रद्धाकधीपर्यंत ‘लव्ह जिहाद’मध्ये हत्या होत राहणार?’ या विषयावरील ऑनलाईन ‘विशेष संवादा’त बोलत होत्या.


या वेळी झारखंड येथील ‘पाञ्चजन्य’चे पत्रकार श्रीरितेश कश्यप म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’वरून मुसलमानांविरोधात प्रचार केला जातोअसे सेक्युलरसाम्यवादी आदी सर्वजण दावा करतातपण वास्तवात भारतभरात ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत आहेतबांगलादेश सीमेला लागून असलेल्या झारखंडमध्ये बांगलादेशी मुसलमान घुसखोरीसह जवळजवळ सर्व अपराधांमध्ये सहभागी असल्याचे आढळून येतेझारखंडमध्ये स्थानिक धर्माधांसोबत कट्टर बांगलादेशी आणि सोबत रोहिंग्या मुसलमान हे सुद्धा हिंदू युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळयात ओढत आहेतसरकारने ‘लव्ह जिहाद’ हा मोठा धोका मानून अन्य अपराधांप्रमाणे याची समीक्षा करून त्याची आकडेवारी जाहीर केली पाहिजे.

हिंदु जनजागृती समितीचे श्रीनागेश जोशी म्हणाले कीमहाराष्ट्रात शेकडो युवती बेपत्ता आहेत, ‘लव्ह जिहाद’च्या घटनाही घडत आहेतअसे नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहेमात्र यावर पोलीसप्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहेआज लव्ह जिहाद्यांना तो अपराधी असतांनाही पाठिंबा मिळत असतोतसेच कठोर शिक्षा होत नसल्याने लव्ह जिहाद्यांना धाक राहिलेला नाही. ‘लव्ह जिहाद’च्या घटनेत अपराध्यांना फाशीची शिक्षा होईलअसे कायदे केंद्र सरकारकडून होणे अपेक्षित आहेतया घटनांचे निकाल वेगाने व्हावेतयासाठी जलदगती न्यायालये हवीत.