Shiv Sena demands that state should be forced to have President’s Rule so at least centre can take over & provide relief to people dependent on mining industry. People can’t depend on BJP leaders for any solution as they’re left inefficient in absence of CM Parrikar:Shiv Sena Goa pic.twitter.com/7l4Q2wsHEg
— ANI (@ANI) March 13, 2018
गोवा खबर:खाणींचा प्रश्न मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहाजरीत भाजप आघडी सरकारला सोडवता येत नसल्याने गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करून खाण अवलंबीतांना केंद्र सरकार मार्फत मदत देऊन दिलासा द्यावा,अशी मागणी गोवा शिवसेनेच्या उपराज्यप्रमुख तथा प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई नाईक यांनी केली आहे.16 मार्च पासून खाणी बंद झाल्या तर खाण अवलंबित आर्थिक संकटात सापडणार आहेत.मुख्यमंत्री पर्रिकर उपचारासाठी अमेरिकेत गेले असल्याने राज्यात घटनात्म पेच प्रसंग निर्माण झाला आहे.भाजप आघाडी सरकारला हा प्रश्न सोडवता येत नसल्याने गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.