गोवा खबर

निरोगी जीवनासाठी योगाभ्यास करा: नागेश सरदेसाई

Published

on

Spread the love

      योगा ही भारतामध्ये ऋषी आणि साधूंनी अनादी काळापासून पाळली जाणारी जुनी प्रथा आहे. योगाभ्यासाचे महत्त्व नेहमीच राहिले आहे, परंतु २१ व्या शतकात जीवनाच्या वेगाने बदलणाऱ्या गतिमानतेमुळे त्याला खूप मोठे प्रमाण प्राप्त झाले आहे. योगाभ्यासामुळे मानवी शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते ज्यामुळे मानवी शरीर आणि मनाला शांती मिळते. दररोज योगासने केल्याने एकाग्रता राखण्यात आणि तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते. हे सर्व वयोगटातील लोकांसाठी अतिशय समर्पक आहे कारण आज प्रत्येक मनुष्याला अनेक आरोग्यसंबधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. परिपूर्ण आकारात येणे ही काळाची गरज आहे आणि योगामुळे ते साध्य होते. आजच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये योगाला मोठ्या प्रमाणावर सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी आणि सध्याच्या काळातील आव्हानात्मक जागतिक काळात चांगली सर्वांगिण व्यक्तिमत्त्वे घडविण्याचे स्थान मिळाले आहे. अशा प्रकारे योगाचा सराव संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

आपले पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या प्रयत्नाने योग ही संकल्पना आज नव्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. योगाला जागतिक स्तरावर नेण्याच्या प्रयत्नात त्यांचे प्रयत्न प्रशंसनीय ठरले आहेत आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केल्याने योगाची प्राचीन परंपरा दूरवर पसरली आहे. हे करताना आम्ही वंशीय प्रदेश आणि भूगोलाचे सर्व अडथळे पार करून योगाला मानवजातीला आवश्यक असलेले महत्त्व दिले आहे. विविध योगिक व्यायामांसाठी मुख्य केंद्र म्हणून आपल्या देशाला मोठा लाभ मिळाला आहे. आज जगात अधिकाधिक योग प्रशिक्षकांची गरज भासू लागली आहे.

आशिया असो, आफ्रिका असो किंवा संयुक्त राष्ट्र संघातही योगाभ्यास मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने केला जातो. शतकानुशतके ज्या देशात योगाचा उगम झाला त्या देशाचा मान  राखण्यासाठी २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र संघाची इमारत भारतीय तिरंग्याने सजविली जाते. ही प्राचिन भारतीय परंपरा विकसित करण्याची गरज पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे आणि त्या दिशेने अधिकाधिक योग तज्ज्ञांची गरज भासत आहे. योगगुरू म्हणून करिअर करण्यासाठी कोणत्याही तरुणासाठी चांगले करिअर निश्चितच फायद्याचे आहे आणि वसुदैव कुटुंबकंम ही संकल्पना साकार करण्यासाठी ते प्रत्यक्षात येऊ शकतात.

              जी-२० च्या वर्षात भारताला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि त्याच्या सॉफ्ट पॉवरने एक महासत्ता बनविण्यासाठी योग हे एक उत्तम साधन आहे. एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या जागतिक बंधुतेला भारताने दिलेली हाक राष्ट्रांच्या समुदायामध्ये शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मानवजातीच्या वैश्विक बंधुत्वाच्या संकल्पनेची सार्थकता आणते.

           या २१ जून रोजी आपण सर्वांनी आपल्या ग्रहाचे रक्षण करण्यासाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे.

Trending

Exit mobile version