गोवा खबर

‘१६-ब’ कलमावरून मनोज परब यांची विजय सरदेसाईंवर टीका

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याच्या जमिनी वाचवण्यासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ‘कलम १६-ब’ चा मुद्दा तापला आहे. आरजीपीचे (RG) प्रमुख मनोज परब यांनी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्यावर आरोप केले.

परब यांच्या मते, सरदेसाई यांनी मंत्री असताना १६-ब कलम आणून गोव्याच्या पर्यावरणाचा नाश केला. सरदेसाई या आंदोलनात सहभागी न झाल्याने परब यांनी त्यांच्यावर ‘सेटिंग’ केल्याचा संशय व्यक्त केला. दुसरीकडे, सरदेसाई यांनी हे आरोप फेटाळून लावत “आरोप करणाऱ्यांची उत्तर देण्याइतकी पात्रता नाही” असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Trending

Exit mobile version