गोवा खबर : गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी कोळशाच्या आयातीविरोधात ठाम भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, कोळशाचा राज्याला दीर्घकालीन उपयोग होत नसून तो पर्यटन व्यवसायाचा विनाश करणार आहे. जर मी मुख्यमंत्री झालो असतो तर राज्यात कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
त्यांच्या मते या धोरणामुळे स्थानिक उद्योग-व्यवसाय यांचे नुकसान होईल आणि आरोग्यावरही विपरित परिणाम होणार आहेत. त्यांनी म्हटले की, कॅसिनो उद्योगामुळे स्थानिक उद्योजकांना नोकरी व व्यवसायाच्या संधी मिळाल्या, परंतु कोळशामुळे ते सर्व टिकणार नाही.
राजकीय संदर्भात ते म्हणाले की, राज्यात व्होट चोरीसारखे प्रकारही होत आहेत व काही पक्ष स्थानिक हित न पाहता इतर पक्षांना फायदाच पोहोचवत आहेत — हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या भाषणातून राज्यातील पर्यावरण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या संरक्षणाला प्राधान्य देण्याचे नियोजन स्पष्ट झाले.