गोवा खबर

बेटी बचाओ बेटी पढाओ घोषणेतून क्रांतीत बदल : फळदेसाई

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना ही केवळ एक घोषणा होती, पण आता ती देशात महिलात्वाचा उत्सव साजरा करणारी क्रांती बनली आहे, असे मत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेची १० वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

फळदेसाई म्हणाले की समाजाने महिलांसाठी असे अनुकूल वातावरण निर्माण करावे जिथे त्यांना यश आणि प्रगतीची प्रत्येक संधी घेता येईल. महिलांनी जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नेहमीच तयार असले पाहिजे कारण यामुळे त्यांना जीवनात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या चांगल्या संधी मिळतील असे ते म्हणाले.

लिंग असमानतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी बेटी बचाव, बेटी पडाव सुरू करण्यात आली आहे. फळदेसाई म्हणाले की मुलींच्या जन्माचे प्रमाण आता ९३३ वरून ९७७ पर्यंत वाढले आहे आणि योजनेचे लक्ष्य नजीकच्या भविष्यात साध्य केले जाईल.

मंत्र्यांनी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी दाबोली येथील तांत्रिक प्रशिक्षण केंद्राच्या कमांडिंग ऑफिसर कर्नल सुमन कुमारी यांचा सत्कार करण्यात आला.

कर्नल कुमारी यांनी आपल्या भाषणात तरुणींना आयुष्यात मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले. भारतीय सैन्याने शिस्त, लवचिकता आणि समर्पणाने त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध केले असे त्या म्हणाल्या.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा आयएएस म्हणाले की लैंगिक समानता ही समाजाची गरज बनली आहे आणि महिला सक्षमीकरण आणि कल्याण आता राष्ट्रीय महत्त्वाचा विषय बनला आहे. त्याचप्रमाणे महिलांना शिक्षण देणे ही समाजाच्या प्रगती आणि विकासासाठी एक मार्ग बनली आहे. त्यांनी आश्वासन दिले की दक्षिण गोवा पोलिस महिलांना प्रत्येक शक्य मार्गाने सुरक्षा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहेत.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती एग्ना क्लीटस, आयएएस यांनी आपल्या स्वागतपर भाषणात बेटी बचाव बेटी पडाव योजनेच्या विविध उद्दिष्टांची माहिती दिली. महिला आणि बाल विकास संचालक श्री. मॅन्युएल बारेटो यांनी गोव्यात बेटी बचाव बेटी पडाव योजनेअंतर्गत सरकार राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच बचत गटातील विविध महिला, महिला व्यावसायिक, क्रीडा क्षेत्रातील महिला, स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला, अंगणवाडी शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका प्रभुदेसाई यांनी केले तर उपजिल्हाधिकारी वेल्टन टेलेस यांनी आभार मानले.

Trending

Exit mobile version