
LIVE : Shri @AmitShah addresses Atal Booth Karyakarta Sammelan in Goa. https://t.co/AHUTt8GwoU
— BJP (@BJP4India) February 9, 2019
Glimpses from ‘Atal Booth Karyakarta Sammelan’ in Goa. pic.twitter.com/sNGqueIt8F
— Amit Shah (@AmitShah) February 9, 2019
पाच वर्षे गोव्यासाठी केले कार्य : नरेंद्र सावईकर
भाजपने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार केल्यानंतर गेली पाच वर्षे मी आणि उत्तर गोव्याचे खासदार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक गोव्याच्या विकासासाठी राबत आहोत. काँग्रेसच्या खासदारांनी गोव्यासाठी काहीही केले नाही. पण गेल्या पाच वर्षांत भाजपने गालजीबाग-तळपण, झुआरी, मांडवी नदीवरील पूल असे प्रकल्प आणले. येणारी लोकसभा निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे. पाच वर्षांत देशात आणि गोव्यात जो विकास झाला त्याच्या आधारे आम्ही निवडणुकीस सामोरे जात आहोत. पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत यासाठी ही निवडणूक आहे. विकास पाहूनच गोव्यातील दोन्ही उमेदवार येत्या लोकसभा निवडणुकीत निवडून द्या, असे आवाहन . सावईकर यांनी केले.
१९ वर्षांत हजार प्रकल्प : श्रीपाद नाईक
उत्तर गोव्यात १९ वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत १ हजार प्रकल्प राबवले गेले. गेल्या पाच वर्षांतच मी आणि सावईकर यांनी खासदार निधीतून दोन्ही जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लावले. येत्या निवडणुकीतही सर्वांनी भाजपला साथ द्यावी. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच आवश्यक आहेत, त्यामुळेच सर्वांनी आपापल्या बुथावर उमेदवार जिंकून येईल या हेतूने काम करावे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी बुथ कार्यकर्त्यांना आवाहन केले.
काँग्रेसने गोव्याचा विकास अडवला : विनय तेंडुलकर
काँग्रेसच्या काळात गोव्यात विकासासाठी निधी मागायला गेल्यानंतर गोव्यात भाजपचे सरकार आहे असे म्हणत गोव्याला विकासासाठी निधी दिला जात नव्हता. काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस आणि गोव्यातील काँग्रेसचे नेते गोव्यात भाजप सरकार असल्यामुळे निधी नाकारत होते. पण भाजपच्या राजवटीत गोव्यात विकासाला सुरुवात झाली, असे तेंडुलकर म्हणाले.
श्रीलंकेसारखी आता काँग्रेसची गत होईल : पर्रीकर
एकत्र रहा, लहान सहान गोष्टी विसरून गोव्यासाठी एकत्र रहा. तुम्ही एकत्र राहिल्यास पूर्वीच्या काळी जी गत श्रीलंकेची झाली होती तीच गत आताच्या काळात काँग्रेसची होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले. मोठे भाषण हे निवडणुकीसाठी राखीव ठेवूया, असे म्हणत ते मोजकेच बोलले पण त्यांनी भाजप कार्यकर्त्यांन एकत्र राहण्याचा सल्ला दिला. हजारोंच्या संख्येने सभेला आलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र राहून नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी चंग बांधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
Goa Chief Minister Manohar Parrikar: Congress will meet the fate of Sri Lanka if BJP workers come together and fight the Lok Sabha elections. Let’s come together, forget minor differences and let’s fight to make Modi the Prime Minister. pic.twitter.com/XUO53emFbq
— ANI (@ANI) February 9, 2019