२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप जिंकेलच, पण इतर राज्यांमध्येही त्यांचा दबदबा पाहायला मिळेल, असं भाकित ‘कारनेज एंडॉमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’ या वॉशिंग्टनमधील थिंक टँकमधील ज्येष्ठ अभ्यासक मिलन वैष्णव यांनी एका लेखात वर्तवलं आहे.
गेल्या ३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपसारख्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं. हे सगळं नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळेच साध्य झालं, असं नमूद करतानाच, देशाची सत्ता मोदी आणि अमित शहा यांच्या हाती केंद्रीत झाल्याची टिप्पणीही त्यांनी केली आहे.